Author: Waheed Gaffar Khan

सचिनच्या बायो डिझेल पंपाला पोलिस कर्मचाऱ्यांचा आशीर्वाद? – अवैध साठवणुकीमुळे नागरिक धास्तावलेनांदुरा– वडनेर भोलजी येथील एका नामांकित पोलिस कर्मचाऱ्याचा आशीर्वाद असल्यामुळे अवैध बायो डिझेल व्यवसाय फोफावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सचिन नावाचा इसम कोणत्याही अधिकाऱ्याची भीती न ठेवता दिवस आणि रात्र स्फोटक व ज्वलनशील पदार्थांची साठवणूक व विक्री करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सचिन याचा बायो डिझेल पंप हा पोलिस कर्मचारी विक्रम राजपूत यांच्या आशीर्वादामुळे अवैधरीत्या सुरू आहे. विशेष म्हणजे, विक्रम राजपूत हे ‘माऊली हॉटेल’चे मालक यांचे नातेवाईक असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेची कृपादृष्टी असल्यामुळेच कारवाई होत नसल्याची चर्चा जनतेमध्ये आहे.स्थानिक नागरिकांनी अनेकदा…

Read More

नांदुरा: वडनेर भोलजी परिसरातील ओ.पी. हद्दीत, राशीद अली खान फिरोज यांच्या ढाब्याच्या मागे रात्रीच्या वेळी बायो डिझेलचा पंप गुपचूपपणे सुरू आहे. जमिनीत टाकी खोदून सुमारे ५००० लिटर बायो डिझेल साठवण्यात आले आहे.याच ढाब्याच्या समोर असलेल्या सचिन माऊली हॉटेलमध्ये, ‘छोटा हत्ती’ वाहनात दोन मोठ्या टाक्या व मशीन बसवून बायो डिझेलची चोरीने विक्री केली जात आहे. त्या ठिकाणीही जमिनीत सुमारे २०,००० लिटर बायो डिझेल साठवले गेले आहे.हा अवैध व्यवसाय दररोज रात्री १:०० वाजल्यापासून ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत जोरात सुरू असतो.

Read More

मुंबई.परिमंडल ६ चे अधीन असलेले आरसीएफ पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करुन त्याचा कडून दोन देशी कट्टा आणि ८ जीवंत कारतूस ही हस्तगत केला आहे.अटक करण्यात आलेला व्यक्तीचा नाव अंगतसिंह श्रीराम गोपाल यादव २९ वर्ष सांगण्यात येत आहे. परिमंडल ६ चे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवले यानी सांगतले की आरसीएफ पोलिसाला गुप्त माहिती मिळाली होती की एक युवक हथियार सह येणार आहे.ही माहिती मिलालेवर पोलिसांनी आपले फील्डिंग लाउन त्या युवकाला अटक केला.आणि त्याचा जवळ दोन देशी बनावटी कट्टा आणि ८ जीवंत कारतूस हस्तगत केला आहे.अटक करण्यात आलेला व्यक्तीचा नाव अंगतसिह श्रीराम गोपाल यादव २९ वर्ष सांगण्यात येते.तो मुलरूपचा उत्तर प्रदेशचा इटावा जिल्हाचा…

Read More

अर्धा दर्जन गुन्हे उघडित आले.२८ तोले सोने आणि २ किलो चांदीच्या आभूषण आणि नगदी हस्तगत.मुंबई.मुलुंड पोलिस हद्दीत झालेला एका घरफोडीच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.ज्याचा नाव राजेश अरविंद राजभर ३२ वर्ष सांगण्यात येते. आरोपीनी तपासात दिलेली माहितीनुसार त्यानी अजुन ५ गुन्हे केले होते. आरोपीला दिवसा उजेडात अटक केली. मिळाली माहितीनुसार,गेल्या काही दिवसा अगोदर मुलुंड पोलिसांच्या हद्दीत एका घरफोडीची घटना घडली होती.पोलिसांचा तपास केल्यावर पोलिसांनी आरोपी राजेश अरविंद राजभार यांना ठाणे येथील कलवा भागातून अटक केली.जेव्हा त्या आरोपीनी कडून पोलिसांनी विचारण्यास सुरुवात केली तेव्हा त्याने इतर ५ चोरीच्या घटना घडवून आणल्या कबूली दिली.त्यानुसार पोलिसांनी एकूण १५ लाख ६५ हजार मालामत्ता त्याचा…

Read More

प्रतीनिधी सौ. सायली गायकवाड (खेड पुणे)घाटातून बैल घेऊन जाणारे टेम्पो चालकाचा ताबा सुटल्यामुळे टेम्पो पलटी झाला, यामध्ये कोंडू सतू बांगर वय वर्ष 55 यांचा अपघातात मृत्यू झाला असून अन्य जखमींना कुडे बुयेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे. ढाकाळे येथे यात्रेनिमित्त खेड तालुक्यातील कुडे बुद्रुक येथून बैल व बैलगाडा घेऊन जात असताना घोटवडी रस्त्याने जात असताना रस्त्यातील खडीमुळे चालकाचा ताबा सुटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. सदरची घटना शुक्रवारी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे. घोटवडी धामणगाव रस्त्यावर खडी पसरल्यामुळे अनेक अपघात घडून येतात असे येथील नागरिकांनी सांगितले.

Read More

उल्हासनगरात चेटीचंड महायात्रेत सिंधी संस्कृतीची झलक, हजारो भाविकांचा सहभागउल्हासनगर : सिंधी समाजाचा सर्वांत मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेटीचंड निमित्त उल्हासनगरात भव्य महायात्रेचे आयोजन करण्यात आले. झुलेलाल मंदिराजवळून सुरुवात झालेल्या या महायात्रेचा समारोप रात्री स्वामी शांती प्रकाश आश्रम येथे झाला. या यात्रेत सिंधी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले.सिंधी समाजाचे आराध्यदैवत साई झुलेलाल यांच्या अवतरण दिनानिमित्त दरवर्षी उल्हासनगरातून भव्य महायात्रा काढण्यात येते. यंदाही हजारो भाविक या यात्रेत सहभागी झाले. यात्रेसाठी शहरभर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती, तसेच मुख्य चौकांमध्ये भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या.…

Read More

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी आता खड्डे तक्रार निवारण प्रणाली मुंबई, दि. २९ – पावसाळ्यानंतर रस्त्यांमध्ये खड्डे पडतात. असे खड्डे जलद दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना आता खड्डयांबाबतची तक्रार ऑनलाईन करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजाचे संगणकीकारण करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यासोबतच खड्ड्यासाठी तक्रार प्रणाली विकसीत केली आहे. नागरिक या प्रणालीच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. प्रथम PCRS अँप गुगल प्ले स्टोअर, केंद्र शासनाच्या m- Seva portal, किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे संकेतस्थळ www.mahapwd.gov.in या संकेतस्थळावरून मोबाईलवर डाउनलोड करावे. नागरिकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP चा वापर करावा…

Read More

रेडीओ क्लब जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर मुंबई, दि.२९: गेट वे ऑफ इंडिया जवळील समुद्रात रेडीओ क्लब येथे जेट्टीचे बांधकाम करण्यात येत आहे. या जेट्टीबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले. जेट्टी निर्माणामुळे येणाऱ्या अडचणी, शंका व होणारी गैरसोय, सूचना आदींबाबत विधान भवनातील कॅबिनेट कक्षात स्थानिकांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांशी चर्चेदरम्यान अध्यक्ष ॲड. नार्वेकर बोलत होते. बैठकीस बंदरे मंत्री नितेश राणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी…

Read More

धाराशिव दि.29 मार्च (जिमाका ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र तुळजापूर येथे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीची विधिवत पुजा करून दर्शन घेतले. यावेळी मंदिर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कवड्याची माळ घालून स्वागत केले. श्री फडणवीस यांनी यावेळी भवानी शंकराचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार व ऐतिहासिक स्तंभ कलाकृतीचे अनावरण केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या समवेत मित्राचे उपाध्यक्ष तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व पोलीस अधीक्षक संजय जाधव उपस्थित होते. श्री.फडणवीस यांनी…

Read More

येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट;आराखड्यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही धाराशिव,दि.29 मार्च (जिमाका) : तुळजापूर विकास आराखड्याला शासनाने तत्वत: मान्यता दिली असून यातील महत्त्वाच्या कामांना तातडीने निधी वितरीत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आराखड्यातील कामांमुळे येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट झालेला दिसेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात मुख्यमंत्र्यांसमोर तुळजापूर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मित्राचे उपाध्यक्ष तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ.श्रीकर…

Read More